Tuesday, June 18, 2019

मंत्रोपासाना का करावी ? | Purpose of Mantra-Upasana




मंत्रोपासना समजण्यासाठी प्रथम मंत्र म्हणजे काय ?  हे समजले पाहिजे.  मननात् त्रायते इति मन्त्रः |  जो मननाच्या साहाय्याने साधकाचे रक्षण करतो, त्यास ‘मंत्र’ असे म्हणतात.  रक्षण याचा अर्थ केवळ बहिरंगाने संकटांच्यामधून रक्षण नव्हे. जीवनामध्ये संकटे ही येणारच !  एक संकट गेले की, दुसरे संकट दत्त म्हणून समोर उभे असतेच.  जीवनामध्ये सतत छोटे-मोठे, चांगले-वाईट प्रसंग घडतच राहतात.  बहिरंगाचे रक्षण हे खरे रक्षण नसून मनाचे सामर्थ्य वाढणे, हेच खरे रक्षण आहे.  मन सामर्थ्यशाली होण्यासाठीच ‘मंत्रोपासना’ आहे.  

किंवा रक्षण म्हणजेच मृत्यूच्या भीतीपासून रक्षण होय.  मनुष्याला सतत मृत्यूची भीति ग्रस्त करते.  या भीतीपासून मुक्त व्हावयाचे असेल तर त्यासाठी मृत्यूच्या कल्पनेचा निरास होणे आवश्यक आहे.  म्हणून मृत्यूपासून रक्षण म्हणजेच अज्ञानापासून रक्षण होय.  त्यासाठीच अंतःकरणामध्ये ज्ञानसूर्याचा उदय झाला पाहिजे.  या ज्ञानप्राप्तीसाठी ‘मंत्रोपासना’ हीच साहाय्यकारी साधना आहे.  

किंवा रक्षण म्हणजे संसारापासून रक्षण होय.  संसार म्हणजे गृहस्थाश्रम नव्हे !  तरसंसरति इति संसारः |  ज्याठिकाणी सतत बदल, विकार होतात, त्यास ‘संसार’ असे म्हणतात.  आपल्या मनामध्ये सतत क्षणाक्षणाला अनंत बदल होत असतात.  मनामध्येच राग-द्वेष, काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर, सुख-दुःख, कपट-असूया, स्वार्थ, लोलुपता, कामना अशा अनंत वृत्ति सतत निर्माण होत असतात.  यामुळेच मनात सतत संघर्ष अनुभवायला येतो.  मन अत्यंत अस्थिर, उद्विग्न, विक्षिप्त असते.  यालाच ‘संसार’ असे म्हणतात.  

यामधून बाहेर पडण्याचा आपण खूप प्रयत्न करतो, परंतु या चक्रव्यूहातून आपणास बाहेर पडता येत नाही.  जसे, रेशमाचा कीडा स्वतःच स्वतःभोवती जाळे विणतो व बद्ध होतो.  तसे आपणच आपल्याभोवती कल्पनेने जाळे निर्माण केलेले आहे.  माझे-माझे म्हणून घट्ट पकडलेले आहे.  मी स्वतःविषयी कल्पना करतो, विश्वाबद्दल, अन्य व्यक्तींच्याबद्दल कल्पना करतो व त्या कल्पनाच मला बद्ध करतात.  त्यामधून नंतर इच्छा असूनही सुटू शकत नाही.  या सर्व मनोकाल्पित संसारामधून मुक्त होण्यासाठी ‘मंत्रोपासना’ हे प्रभावी साधन आहे.  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ

3 comments:

  1. When it comes to the administrations of Mumbai Escorts, they are so fascinating that you cannot live without profiting them. The reason for typically that they have delightful administrations to offer you. Both sorts are reachable in a palatable number so that men don't confront any deficiency. They contract their soul mates as per their cheap. Mumbai Free escorts are high-profile companions and you require to have a fat wallet to profit from their services.
    gondia-escorts l
    jalgaon-escorts l
    jalna-escorts l
    kolhapur-escorts

    ReplyDelete
  2. For all you Gentlemen who like to unwind and appreciate a sluggish Sunday evening with a small more creative energy than fair sitting at domestic and perusing the papers at that point here is my direct to perfect way">the most perfect way to do so sunabeda-escorts. It is all almost setting the correct adjust when engaging an Escort on a Sunday evening. Your High-Class Escort in Surat will still need to be impressed but she will get it it'll not be the same kind of exercises you'd regularly do on a Saturday evening for illustration. Never fear though in a city as assorted as Surat Escorts it is conceivable to strike that exceptionally fine adjust and succeed in making everybody upbeat. titlagarh-escorts
    angul-escorts
    balasore-escorts

    ReplyDelete