Tuesday, December 6, 2016

कर्म ईश्वरार्पण का करावे ? | Why God-Oriented Actions?

ईश्वरार्पण केलेल्या कर्मामध्ये –

१. कर्म विषयाभिमुख नसते.
२. जरी कर्म बाह्यांगाने शारीरिक असेल तरीही त्याचा आश्रय परमेश्वरच असतो. म्हणजेच प्रत्येक कर्म ईश्वराभिमुख झालेले असते.
३. अन्य कर्मांच्यामध्ये असणाऱ्या कामुकतेचा आणि उपभोगवासनेचा लवलेशही नसतो.
४. कर्म निस्वार्थ, निष्काम वृत्तीने ईश्वरसेवा म्हणून केले जाते.
५. प्रत्येक कर्मामध्ये असलेली कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावना परमेश्वरचरणी अर्पण केलेली असते.
६. कर्म जीवाला विषयाभिमुख आणि विषयासक्त न करता ईश्वराभिमुख करून ईश्वरस्वरूपामध्ये तल्लीन, तन्मय करते.
७. रागद्वेषादि आणि कामक्रोधादि विकार तसेच, त्यांचा होणारा परिणाम कमी होवून मन शुद्ध होते.

थोडक्यात, ईश्वरार्पणबुद्धीने केलेले कर्म हे बंधनकारक न होता चित्तशुद्धीचे साधन होवून सत्वगुणाचा उत्कर्ष होतो आणि तेच कर्म क्रमाने मनुष्याला मोक्षापर्यंत म्हणजेच निरतिशय आनंदाच्या प्राप्तीपर्यंत घेवून जाते.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment