Monday, September 24, 2018

सोनेरी तारुण्यावस्थेची दुर्दश | Plight of Golden Youth




तारुण्यावस्थेमध्ये इंद्रिय भोगांसाठी वखवखलेली असतात.  मनुष्य विषयलंपट, स्त्रीलंपट होतो.  पुरुष स्त्रीमध्ये तर स्त्री पुरुषामध्ये आसक्त होते.  एकमेकांच्याशिवाय ते एक दिवसही जगू शकत नाहीत.  त्यांचे मन, शरीर अत्यंत व्याकूळ व अस्वस्थ होते.  रात्रंदिवस भोग घेणे, हेच त्यांचे जीवन बनते.  

याप्रमाणे
- खाणे, पिणे, मजा करणे, टि. व्ही. पाहणे, हॉटेलमध्ये जाणे,
- नको-नको त्या पदार्थांचे व मादक द्रव्यांचे सेवन करणे,
- समोर भोग्य पदार्थ, सुंदर-आकर्षक वस्तु दिसली की, मागचा-पुढचा विचार न करता ती खरेदी करणे,
- मित्र-मैत्रिणींबरोबर दिवस-रात्र बाहेर थांबणे,
- मोबाईलवर तासनतास बोलणे,
- घरी आल्यावर येथेच्छ अथकपणे टि. व्ही. वरच्या सिरीअल पाहणे,
- नृत्य-गाणी, डान्स अशा गोष्टी करीत राहणे,
- पाश्चिमात्य मुलांच्याप्रमाणे फ्रेंड सर्कल निर्माण करणे,
- अश्लील हास्यविनोद करणे,
- तमोगुण अनावर होऊन झोपून राहणे,
- वडिलधाऱ्या मंडळींचा छोटाही सल्ला न ऐकणे,
असे एक नव्हे, दोन नव्हे, अनंत प्रकारचे अपराध करून स्वैरपणे तरुण पिढी अधःपतित होताना दिसते.  

याचे कारण तरुण पिढीसमोर निश्चित ध्येय नाही, आदर्श नाही, दिशा नाही व धर्माधार्माचे व जीवनाचे सम्यक् ज्ञान नाही.  कामनेने धुंद होऊन स्वैर, उच्छृंखल उपभोग घेता-घेता तारुण्य केव्हा संपले व आपण केव्हा ज्येष्ठ नागरिक झालो, हेही मनुष्याला समजत नाही.  

  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ





No comments:

Post a Comment