Tuesday, October 27, 2015

शोकाची कारणे | Causes of Grief


ज्या ज्या वेळी मनुष्याला शोक किंवा दुःख होते, त्यावेळी मन अस्वस्थ, व्याकूळ होते.  याची अनेक कारणे आहेत.

१.      एखादा अनपेक्षित धक्का देणारा प्रसंग आला तर त्याच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो.  मन अत्यंत अस्वस्थ, शोकाकुल, अगतिक होते.  त्यावेळी शारीरिक आणि इंद्रियांच्या भोगाची इच्छाही राहात नाही.  परंतु काळाच्या ओघात दुःखाचा झालेला परिणाम कमी होतो आणि मनुष्य पुन्हा पूर्ववत होतो.  म्हणजे अशा दुःखांना काळ हेच औषध आहे.

२.      मनुष्याच्या मनात एखाद्या अत्यंत प्रिय विषयाची कामना असेल तर ती विषयकामना त्याला कामनापूर्ति होईपर्यंत सतत अस्वस्थ, व्याकूळ करते आणि खूप परिश्रम करूनही ती वस्तु प्राप्त झाली नाही तर तो अत्यंत दुःखी, निराश होतो.  अस्वस्थ होतो.  जर त्याला इच्छित वस्तु दिली तर सर्व दुःख नाहीसे होते.  तो आनंदी होतो.

९९% लोकांचे दुःख या दोन कारणांमुळेच असते.  म्हणून असे लोक गुह्य ज्ञान प्राप्त करण्याचे अधिकारी होत नाहीत.  त्यांच्यामध्ये खरी जिज्ञासा नसते.

परंतु ऐहिक विषयांची समृद्धि, सत्ता आणि पारलौकिक विषयांची प्राप्ति, सत्ता आणि त्यांचा उपभोग हे अंतरिक शोक नाहीसा करण्याचे साधन नाही.  तीव्र वैराग्य प्राप्त होऊन आत्मज्ञान झाल्याशिवाय अत्यंत शोकनिवृत्ति होत नाही.  ज्याला आचार्य म्हणजेच गुरु प्राप्त झालेले आहेत तोच आत्मस्वरूप जाणतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment