एकान्तिकम्
आत्यन्तिकम् इति श्रेयः |
जे
केव्हाही कधीही एकच फल देते आणि मिळाल्यानंतर जे निरतिशय असते ते श्रेयस होय. साधना केल्यानंतर निश्चितपणे
प्राप्त होते ते एकान्तिकम् आणि प्राप्त झाल्यानंतर
नित्य, शाश्वत, निरतिशय स्वरूपाचे असते ते आत्यन्तिकम्.
एखादे
विशिष्ट कर्मफळ प्राप्त करण्यासाठी कर्म हे साधन दिले जाते. कर्मरूपी प्रयत्न केले तरी अमुक इतकेच फळ मिळेल
असे निश्चित सांगता येत नाही. ते फळ
एखाद्याला मिळाले तर दुसऱ्याने अनुसरण केल्यानंतर त्याला मिळेलच असेही नाही. एखाद्या कर्माचे फळ मिळाल्यानंतर तेच कर्म नंतर
त्याच मनुष्याने केले तर पूर्वीइतकेच फळ मिळेल याची निश्चिति नाही. याचे कारण मनुष्य कर्तुम्-अकर्तुम् नाही, तर
कर्म आणि कर्मफळावर दृष्ट आणि अदृष्ट अनेक घटक नियमन करीत असतात. ते मनुष्याच्या हातात नसल्यामुळे कर्माचे फळ
अनिश्चित आहे. ते एकान्तिक होऊ शकत
नाही.
अर्जुन
श्रीकृष्णाला ‘श्रेयस’ या शब्दामधून तीन्हीही काळामध्ये जे निरतिशय
कल्याणकारक आहे ते मागत आहे. असे ‘फळ’
देश-कालावर तसेच कर्मावर अवलंबून असणार नाही. ते फळ म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान हे एकच
आहे.
आत्मज्ञानाचे
फळ आत्मप्राप्ति कोणत्याही साधकाला केव्हाही मिळू शकते. ते कर्मजन्य नाही तर ज्ञानाचे फळ आहे. ज्ञान हे अज्ञानाचा ध्वंस करून
आत्मस्वरूपाची प्राप्ति करून देते की, जी नित्य आणि शाश्वत प्राप्ति आहे, कारण
आत्मस्वरूप हेच नित्य आहे. त्यानेच
जीवनाला तृप्ति मिळेल.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment