Tuesday, October 7, 2014

कर्मानुरूप गति | Progress Through Actions




जघन्यगुणवृत्तस्थाः अधो गच्छन्ति तामसाः |  (गीता अध्याय १४-१८)
 प्रत्येक जीवाला त्याच्या कर्म व उपासनेनुरूप गति प्राप्त होते.  निकृष्ट असलेल्या गुणांच्यामध्ये जे स्थित आहेत असे मूढ, तामसी पुरुष अधोयोनीला जातात.
 यामुळे कर्म न करण्यापेक्षा नियत कर्म करणे हे निश्चितच श्रेयस्कर आहे, कारण
 
 १. नियत कर्मामुळे इंद्रियांच्या सहजस्वाभाविक, स्वैर विषयोपभोग घेण्याच्या प्रवृत्तीवर हळुहळू नियमन होते.
 २. अधर्मप्रवृत्तीपासून इंद्रिये निवृत्त होवून धर्माचरण आणि सदाचारामध्ये प्रवृत्त होतात.
 ३. यामुळे इंद्रियांच्यावर दमन होते.
 ४. नियत कर्म न करण्यामुळे निर्माण होणारे प्रत्यवाय दोष नाहीसे होतात.
 ५. ईश्वराची कृपा आणि अनुग्रह प्राप्त होतो.
 ६. हळुहळू चित्तशुद्धि प्राप्त होवून रागद्वेषांचा क्षय होतो. तसेच, पापकर्मांचाही क्षय होतो.
 ७. त्यामुळे अंतःकरण विवेकवैराग्यसंपन्न होवून संयमित होते.
 ८. या सर्वांचा परिपाक म्हणजे गुरुप्राप्ति होतेत्यानंतर गुरुकृपेने ज्ञानप्राप्ति होवून मोक्षप्राप्ति होते.  जीवाला पूर्णता मिळते.  जीव सर्व सुखदुःखात्मक, अविद्याकल्पित संसारामधून मुक्त होतो.
 
यावरून सिद्ध होते की, नियत कर्म करणे हेच श्रेयस्कर आहे.  म्हणून हे अर्जुना !  तुझी वृत्ति कर्म न करण्याकडे ठेवू नकोस.  तर कर्म करण्याकडेच ठेव.
 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment