Tuesday, October 8, 2013

शास्त्राचीच जिज्ञासा का ? | Why have curiosity for Shaastra ?

 

 
 
शास्त्राचीच जिज्ञासा का निर्माण करावी ?  आत्मज्ञानाबद्दल दृढ इच्छा का असावी ?
 
१. त्याचे कारण असे की, विषयांची इच्छा कितीही पूर्ण केली तरी ती मनुष्याला तृप्त, पूर्ण, संतुष्ट करू शकत नाही.  याउलट जितकी इच्छापूर्ति करावी, तितका जीव असंतुष्ट व अतृप्तच राहतो.
 
२. दुसरे कारण म्हणजे, विश्वात कोणताही एक विशिष्ट विषय नाही की त्या विषयाची इच्छा पूर्ण केल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात.  उलट एका विषयाची इच्छापूर्ति करतानाच, दुसरी नवीन इच्छा निर्माण होते व ती इच्छा पूर्ण होत नाही तोच, नवीन इच्छेच्या पूर्तीमध्ये तो अडकतो.  या इच्छा परत परत मनुष्याला कर्मात प्रवृत्त करतात.  तसेच या इच्छा कधीही न संपणाऱ्या आहेत.  मनुष्य संपून जातो पण इच्छा संपत नाहीत.
 
३. तिसरे कारण असे की, विषयांच्या इच्छा मनुष्याला ‘आप्तकाम’ बनवत नाहीत.  आप्तकाम म्हणजे पूर्णात्मा !  पूर्णात्मा म्हणजे ज्याने सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत असा !  इच्छांची पूर्ति त्याला पूर्ण तृप्त बनवत नाही.
 
 
व्यवहारात कितीही विषयांची प्राप्ति केली तरी त्या प्राप्तीला देशकालाची मर्यादा पडते.  मग ती ऐहिक किंवा पारलौकिक विषयांची इच्छा असो.  त्या इच्छांची पूर्ति हे मनुष्याचे अंतिम साध्य होऊ शकत नाही.  कधीच न संपणाऱ्या व सतत एकापाठोपाठ निर्माण होणाऱ्या इच्छा मनुष्याला सतत साधकाच्या अवस्थेत ठेवतात.  तो पुढे प्रगति – उन्नति करू शकत नाही.

 

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ

 

No comments:

Post a Comment